दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडलेल्या ज्योतिष विषयावरील श्री. श्रीराम पागे यांच्या व्याख्यानाचा संक्षिप्त गोषवारा वृत्तांत सदरात दिला आहे.

काळाचे ज्ञान करून देणारे साधन म्हणजे पंचांग ! काळाची अनुकूलता पाहून कार्य केले तर कार्यसिद्धी हमखास मिळते . आकाशातील तारे , ग्रह जे अखंड गतिमान असतात , त्यांच्या आकर्षणाचा , किरणाचा , तेजाचा प्रभाव आपल्यावर नकळत होत असतो . कृत किंवा सत्ययुग , त्रेतायुग , द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युगे आहेत . आपल्या शास्त्रात जगाचा उत्पत्तीकर्ता ब्रह्मदेव मानला असून त्याच्या एका दिवसाला एक कल्प म्हणतात . त्या एका कल्पात 14 मनू होतात . मनू म्हणजे या पृथ्वीवरचा प्रथम पुरुष ! आतापर्यंत सहा मनू होऊन गेले आणि सध्या सातव्या वैवस्वत मनुचे राज्य सुरू आहे . चारही युगे संपली की एक महायुग होते . कलियुग ४३२००० वर्षांचे आहे. कलियुगाच्या दुप्पट द्वापार युग, तिप्पट केली की त्रेतायुग व चौपट केली की कृतयुगाचा काळ होतो.

संवत्सर म्हणजे वर्ब ! शालिवाहन शकात साठ संवत्सरे आहेत. त्यातली पहिली वीस वर्बे ब्रह्मदेवाची , दुसरी वीस वर्बे भगवान विष्णूंची, तिसरी वीस वर्बे शिवांची मानली गेली आहेत. याचाच दुसरा अर्थ क्रमाने उत्पत्ती , स्थिती, लय असा करतात. सध्या ‘शोभन’ नाम संवत्सर सुरू आहे आणि क्रमाने हे ३७वे आहे. शालिवाहन शक आणि इसवी सन यात ७८ वर्षांचा फरक आहे . नर्मदेच्या उत्तरेला विक्रम संवत व दक्षिणेला शालिवाहन शक मानतात.

आपल्या येथे आपण देशपांडे पंचांगच का वापरतो ? याचे कारण म्हणजे आपल्या सद्गुरूंनी विचारांती त्यालाच प्राधान्य दिले आहे ; कारण हे सूर्य सिद्धांत पद्धतीवर आधारित आहे . त्या पद्धतीचे सूत्र आहे वागवृध्दीरसक्षय.  याचा अर्थ असा की ५ घटींनी तिथीची वृद्धी व ६ घटींनी क्षय असा आहे . म्हणजे तिथे जास्तीत जास्त ६५ घटिका व कमीत कमी ५४ घटिका होते. संपूर्ण वर्षात याचा मेळ बरोबर साधला जातो . हा सूर्यसिद्धांत अतिशय प्राचीन व संयुक्तिक असल्याने आपल्या सद्गुरूंनी ह्या पद्धतीला विचारांती प्राधान्य दिले आहे.

 पंचांग म्हणजे ५ अंगे . ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण, योग होत. त्यांचा संक्षिप्त खुलासा असा,

  • तिथी अमावस्येला सूर्य चंद्र एकत्र असतात. चंद्राची गती जास्त असल्याने तो सूर्याच्या पुढे १२ अंश गेला की एक तिथी होते. याप्रमाणे १५ व्या तिथीला पौर्णिमा व ३० व्या तिथीला अमावस्या येते.
  • वार – वाराची सुरुवात रविवारपासून करतात.
  • नक्षत्रे – एकूण 27 नक्षत्रे आहेत. नक्षत्र म्हणजे आपल्या स्थानापासून ढळत नाही ते नक्षत्र .
  •  योग- एकूण २७ योग आहेत . योग म्हणजे सूर्य व चंद्र यांच्या गतीची बेरीज. १३ अंश अधिक २० कला झाली की एक योग होतो. यातील ९ योग अशुभ म्हणून सांगितले गेलेले आहेत.
  • करण – तिथीच्या अर्ध्या भागाला करण म्हणतात. एकूण ७ करणे आहेत.  स्थिर व चर असे दोन प्रकारचे करण असतात. विष्टी करणारालाच भद्रा करण म्हणतात. चंद्र ६ अंश पुढे गेला की एक करण होते.

पंचांगात अनेक महत्त्वाच्या व मानवाच्या हिताच्या गोष्टी असतात त्या सर्वांचा संक्षिप्त आढावा घेऊ.

  • अयने- अयन म्हणजे जाणे. सूर्य ६ महिने उत्तरेकडे व ६ महिने दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. त्याला उत्तरायण – दक्षिणायन म्हणतात.
  • ऋतू – वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतू असून त्या प्रत्येकाचा कालावधी दोन महिन्यांचा असतो.
  • भारतीय महिने – चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे बारा महिने असतात.
  • बारा राशी – मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन
  • सौर वर्ष – सूर्य अश्विनी नक्षत्रापासून निघून पुन्हा तिथपर्यंत येण्याला सूर्याला 365 दिवस ५ तास व ४९ मिनिटे लागतात.
  • चंद्र वर्ष – पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो , तेव्हा चैत्र महिना. विशाखा नक्षत्रात असतो , त्यावेळेस वैशाख महिना ; याप्रमाणे असते .
  • अधिक मास – सूर्य व चंद्राच्या गतीत जेव्हा ११ दिवस व ६ तासांचे अंतर पडते , तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो ; त्याला अधिक मास म्हणतात . ज्या चांद्र मासात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही , तेव्हा अधिक मास येतो.
  • पंचक – पाच प्रकारच्या दोषांना पंचक म्हणतात . रोग-अग्नी-राज-चोर-मृत्यू हे पाच दोष मानले आहेत. रोग पंचक हे लग्न व मौंजीला वर्ज्य . अग्निपंचक गृहप्रवेशाला , राजपंचक राजकार्याला , चोर पंचक प्रवासाला व अग्निपंचक गृहप्रवेशाला वर्ज्य मानले आहे.
  • गुरुपुष्यामृत योग – ज्या वेळेस गुरु ग्रह आपल्या भ्रमणात कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा श्रेष्ठ असा हा योग होतो.
  • साडेतीन मुहूर्त – १) चैत्र शुद्ध प्रतिपदा (२) दसरा (३)बलिप्रतिपदा व अक्षय तृतीया अर्धा मुहूर्त.
  • तिथी-वार-नक्षत्र यांच्या योगाने काही योग पंचांगात दिलेले असतात. त्यात दग्धयोग, मृत्यूयोग, यमघंटयोग, अमृतसिद्धीयोग
  • तिथीवासर – भागवत एकादशीचा उपवास द्वादशीच्या पहिल्या पादाला सोडणे.
  • करीदिन – मकर संक्रांत (जानेवारी), कर्कसंक्रांत (जुलै), भाउका अमावस्या (वैशाख), होळी ग्रहण , यांच्या दुसऱ्या दिवसाला करीदिन म्हणतात.
  • याच्याशिवाय पंचांगातील इतर माहितीमधे (१) तिथीवासर (२) करीदिन (३) गजच्छाया पर्व(४) अर्ध्योदय व महोदय पर्व (५) कपिलाषष्टी पर्व (६) वाहणी योग (७)पद्मक योग (८)प्रदोष (९)अमावस्या (१०)चतुर्थी (११)घबाड योग (१२)निशिद्ध काळ अशी अनेक प्रकारच्या व्रत, उपासना, कार्य सिद्धीसाठीची माहिती दिलेली असते.
  • पर्जन्य विचारात पावसाची नऊ नक्षत्रे, त्यांचे वाहन तसेच पु. स्त्री. चं स् असे लिहिले असते. त्यावरून पावसाचा अंदाज करता येतो.
  • ग्रहण विचार व त्याचे होणारे परिणाम
  • शुभ-अशुभ मुहूर्त , वास्तु मुहूर्त , नवग्रह उपासना , जन्म मृत्यूची शुभ-अशुभ वेळ, विवाह गुण मिलन, अधिक मासाची माहिती वगैरे अनेक गोष्टींचा खजिना म्हणजे पंचांग आहे.

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

Slider