अभ्यास सत्र क्रमांक १ दिनांक २७.०२.२०२२
विषय
भागवत धर्म: व्याख्या, व्याप्ती, स्वरूप
आत्यंतिक क्षेमाचे साधन,
भगवत भक्तांची लक्षणे
श्री सद्‍गुरु बोधवचन



श्री भगवंतांची प्राप्ती होणे म्हणजे "योग ";
आणि प्राप्त झालेले ते तत्व टिकवून ठेवणे हाच "क्षेम " होय.

सहेतुक, अहेतुक कर्मे, लौकिक, वैदिक,स्वाभाविक कर्मे श्रीभगवंतांचे ठायी अर्पण करणे म्हणजे भागवतधर्म पालन करणे.
इंद्रिये , बुद्धी, अहंकार यांच्या माध्यमातून कर्मे घडतात. मानसिक, वाचिक आणि कायिक कर्मे ही तीन प्रमुख कर्मे. यांचे समर्पण करायचे आहे.
आपल्या नित्योपासना या पुस्तिकेत जो दिनक्रम सांगितला आहे त्यातही रात्री झोपी जाण्यापूर्वी सद्गुरूंना नमस्कार करून आपली सर्व कर्मे त्यांनाच समर्पित करून झोपी जावे असे सांगितले आहे.
मग ती चांगली कर्मे असोत वा वाईट कर्मे ती सारी कर्मे आणि त्यांचे फळ तुम्हालाच समर्पित असो अशीच प्रार्थना केली म्हणजे कर्म-समर्पण आपोआप घडते.

अभ्यास सत्र क्रमांक २ दिनांक ०६. ०३. २०२२
विषय
मायेचे स्वरूप,
मायेवर विजय मिळवण्याचे उपाय,
सद्गुरू आणि सत्शिष्य लक्षणे,
अभक्तांची गती
|| श्री सद्‍गुरु बोधवचन ||



कुठल्याही स्थितीत, मनात आलेले सद्विचार हे टाळू नयेत.
स्वत:च्या चुका निर्भयपणे कबूल कराव्यात.
चुका दुरुस्त करण्याच्या आड अहंकार येऊ देऊ नये.

माया म्हणजे भास ;विषयासक्ती आणि त्यातून उत्पन्न होणारे मोहआदि षडविकार मायेस विस्तारण्यास मदत करतात.
अहंकार रहित ज्ञान हे मायेवर विजय मिळवण्यास उपयुक्त ठरते.
परंतु प्रत्येकालाच ज्ञानी होता येते असे नाही. असे निराभिमानी अज्ञानी गुरुभक्तीच्या आधारे मायेवर विजय मिळवू शकतात.
सत्संगामुळे अज्ञानाचा नाश होतो उन्नती होते.
मथितार्थ एकच,उत्तम शिष्याने नित्य साधन करून गुरुशरण व्हावे, अनन्य व्हावे, सत्संग साधावा , ज्ञानाने किंवा भक्तीने मायेवर विजय मिळवावा आणि मोक्ष साधून घ्यावा."

previous arrow
next arrow
Slider

अभ्यासवर्गातील काही क्षणचित्रे


previous arrow
next arrow
Slider

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

Slider