Session 1
अभ्यास सत्र क्रमांक १ दिनांक २७.०२.२०२२
विषय
भागवत धर्म: व्याख्या, व्याप्ती, स्वरूप
आत्यंतिक क्षेमाचे साधन,
भगवत भक्तांची लक्षणे
श्री सद्‍गुरु बोधवचन

श्री भगवंतांची प्राप्ती होणे म्हणजे "योग ";
आणि प्राप्त झालेले ते तत्व टिकवून ठेवणे हाच "क्षेम " होय.

सहेतुक, अहेतुक कर्मे, लौकिक, वैदिक,स्वाभाविक कर्मे श्रीभगवंतांचे ठायी अर्पण करणे म्हणजे भागवतधर्म पालन करणे.
इंद्रिये , बुद्धी, अहंकार यांच्या माध्यमातून कर्मे घडतात. मानसिक, वाचिक आणि कायिक कर्मे ही तीन प्रमुख कर्मे. यांचे समर्पण करायचे आहे.
आपल्या नित्योपासना या पुस्तिकेत जो दिनक्रम सांगितला आहे त्यातही रात्री झोपी जाण्यापूर्वी सद्गुरूंना नमस्कार करून आपली सर्व कर्मे त्यांनाच समर्पित करून झोपी जावे असे सांगितले आहे.
मग ती चांगली कर्मे असोत वा वाईट कर्मे ती सारी कर्मे आणि त्यांचे फळ तुम्हालाच समर्पित असो अशीच प्रार्थना केली म्हणजे कर्म-समर्पण आपोआप घडते.

previous arrow
next arrow

अभ्यासवर्गातील काही क्षणचित्रे


DSC_8690
previous arrow
next arrow

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.